‘ललित स्वरूपाच्या लेखनात वाचकाला आपली हरवलेली, विखुरलेली संवेदनशीलता सापडते,’ असे डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांनी या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटले आहे. ते खरेच, करण म्हणूनच वैचारिक साहित्याच्या जमान्यात ललित लेखनाचा वाचक टिकून आहे. या पुस्तकात वर्षा गजेंद्रगडकर यांचे विविध विषयांवरचे ललित शहरे, अनुवाद, मैत्री, सण, पत्रे, देशाभिमान, पुतळे असे नानाविध विषय आपल्यासमोर येतात.
‘शहरांमधल्या क्राँक्रिटच्या जंगलात हरवलेली समजूत त्याला हिरव्या, दाट जगलांमध्ये जागोजाग भेटत असेल,’ ‘खरं तर हा आतला प्रवास हीच माणूसपणाची खरी खूण आहे,’ ‘चंगळवादाचा जो चष्मा आपण डोळ्यांवर चढवला आहे, त्यामुळे श्रेयस्कर आणि घातक यांच्यातला फरक आपल्याला दिसेनासा झाला आहे.’ अशी अंतर्मुख करणारी वाक्ये पानापानांवर वाचायला मिळतात.
प्रकाशक : अभिजित प्रकाशन
पाने : १३६
किंमत : १५० रुपये
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)